मृत्यु,
तु कोण आहेस, यमदुत की देवदुत,
का लोक घाबरतात तुला, काही कळायला मार्ग नाही.
तीच लोक तुझ्या अस्तित्वाला घाबरतात, ज्यांनी तुला ओळखलंच नाही,
जीव जन्माला आला की लगेच तु त्याची साथ करतो,
तुझ्याएवढा जिवलग मित्र जन्मतःच मिळतो,
जो जीवनाच्या अंतापर्यंत सोबत करतो,
मृत्यु म्हणजे निसर्गाचा एक उपयुक्त आविष्कार आहे,
थकलेल्या जीवाला आराम देणारा तो एक चमत्कार आहे.
खऱ्या लोकशाहीचं उदात्तीकरण फक्त तोच करतो,
गरीब असो वा श्रीमंत, मुर्ख असो वा महंत, तो सर्वाना एकाच तागडीत तोलतो,
जन्मलेल्या जीवाचं भविष्य कोण जाणतो,
पण मृत्यु मात्र सर्वाना आनंतातच विलीन करतो.
अशा अर्थाने मृत्यु मला देवदुत वाटतो,
त्याच्या संगतीत मलासुद्धा जीवनाचा तिटकारा वाटायला लागतो.
त्याला धिक्करण्याआधी त्याचा कार्य समजुन घ्या,
न थकता, न चुकता तो वेळ पाळतो आहे,
अथक प्रयत्न करून तो सृष्टीचा समतोल सांभाळतो आहे.
त्याचा आदर करायला शिका म्हणजे त्याची भीती वाटणार नाही,
तुम्हाला पण कळुन चुकेल, त्याच्यासारखा दुसरा मित्र मिळणार नाही.
No comments:
Post a Comment