Thursday, 29 October 2015

दुभंगलेली नाती :

वस्तू जुन्या झाल्या किंवा नकोश्या झाल्या, कि आपल्याला ती अडगळ वाटायला लागते, मग आपण घर सफाईच्या नावाखाली अश्या वस्तुंना बाहेरचा रस्ता दाखवतो. प्रेमाचं पण तसच काहीसं आहे. एकेकाळी जीवापाड जपलेल नात, काळाच्या ओघात नष्ट होत. ज्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय दिवस सुरु झाला असे वाटत नसे, आपली सर्व सुख दुख जीला सांगितल्याशिवाय आपल्याला करमत नसे, तिच्या सुख दुख्खात पण आपण तेवढ्याच तन्मयतेने समरस होत असु, अशी नातीही कधी कधी जड वाटायला लागतात, मग एकमेकांच्या वागणुकीत दोष आढळायला लागतात. त्याची कारणे काहीही असू शकतात. पण परिणाम एकच असतो. मग आपण अश्या जड नात्यातून बाहेर पडण्यासाठी कारण शोधायला लागतो. नात जोडायला खूप कष्ट घ्यावे लागतात, परंतु ती तोडण्यासाठी अगदी फुटकळ कारणही पुरतात. उदाहरणादाखल "तुझ माझ्याकडे लक्षच नाही" किंवा अगदी याच्या उलट म्हणजे "तू माझ्यावर फारच देखरेख करतोयस / करत्येस", "किती प्रश्न विचारतोस / विचारतेस? घुसमट होत्ये अगदी", "मी का म्हणून तुझं ऐकायचं, मला माझे निर्णय घेता येतात" इत्यादी. खर म्हणजे या वाक्यांना किंवा नंतर कशालाही काही अर्थ नसतो. ते नात जपण्यासाठी घेतलेले कष्ट विसरून आपण त्यांतून बाहेर पडण्यासाठी त्यात अनेकानेक दोष शोधायला लागतो. आणि मग त्यातूनच विसंवाद वाढीस लागतो. विसंवादातून दुरावा वाढायला लागतो, आणि नात्यातील ओढ नष्ट होते. मग होतो एका चांगल्या नात्याचा अंत. यात दोष कोणाचाच नसतो. असेल, तर तो फक्त काळाचा दोष असतो. नाती जोडताना आपण बऱ्याचदा त्याची भव्यता पाहतो, त्यातील खाचखळगे कालांतराने नजरेस पडतात. सोडायचहि असत आणि तोडायचही नसत, मग होते मानसिक ओढाताण. त्यातूनच शाब्दिक खटके उडायला लागतात, एकमेकांवर असले - नसलेले दोषारोप केले जातात. आणि या सगळ्याच पर्यवसान एका सुखसंवादाच्या नात्याचा अंत होण्याने होतो. हे अस होणं गरजेच होत का? याला दुसरा काही पर्याय नव्हता का? न तोडता एका समान पातळीवर हे नात जपता नसत आल का? हे प्रश्न पुन्हा उभेच राहतात अनुत्तरीत. कारण आपण बरेच निर्णय भावनेच्या आधारे घेत असतो. आणि जीथे भावनाच उरत नाही, तिथे या प्रश्नांनाही काही अर्थ उरत नाही. बघा जमल तर, नात्यात दुरावा येईल इतका विसंवाद होऊ देऊ नका. खूप दुर्मिळ झालीयेत नाती आजच्या व्यावहारिक जगात. दुखावलेल मन सावरायला खूप काळ जावा लागतो आणि जरी काळ गेला तरी जखम भरून येईल आणि दुभंगलेली नाती पुन्हा पूर्ववत होतील याची काही शाश्वती नाही 

Tuesday, 20 October 2015



तेरा तसव्वुर :

बरंसोसे छिपे हैं कुछ ख्वाब सिने मे,

तेरे आनेसे उन्हे थी जंमी मिल गयी,

तुझे देखा पहली बार और समझ आयी ये बात,

मेरी शायरीमे क्या थी कमी रह गयी,

यु तो बाते बनाना कोई बडी बात नही मेरे लिये,

पर तेरे आनेसे जुबां थमी रह गयी,

खामोश लफ़्जोको कैसे समझाऊ ये बात,

क्या मुहोब्बतमे मेरे कमी रह गयी,

ना मिलते हो तुम, ना तुम्हारा तसव्वुर कही,

अब जीनेकेलीये तुम्हारी यादें

और उन यादोमे बस तुम्ही रह गयी …. 

Wednesday, 7 October 2015


ऐसे मोड से गुजर रही है जिंदगी,

के तेरी बात नही तो कुछ नही,

तेरी याद नही तो कुछ नही,

जिने के लिये तो बस,

अब तेरा साथ नही तो कुछ नही ….

 


तेरे खफा होने की वजह पता चलती फराज,

तो मैं भी रुठनेका बहाना ढुंढ पाता  ….

Monday, 5 October 2015




वक़्त बहुत कम था,
वरना तुझसे भी दोस्ती कर लेते ए जिंदगी,
मौतसे पुराना रिश्ता है, निभाना हि था,
वरना उसे भी जिना सीखा देते ए जिंदगी …. 





तुझसे बिछडनेके बाद,
ख्वाहीशसी रह गयी है जिंदगी मेरे लीये,
अब मौतही बन गयी है जिंदगी मेरे लीये,
तुझसे बिछडनेके बाद …. 


मनस्वी पाऊस  :

पाऊस आला आणि गेला,
पण नीट बरसलाच नाही,
धरती तहानलेलीच राहिली,
पाऊस मात्र यावेळी परतलाच नाही.

कुठे चुकल गणित कळलंच नाही,
अंदाज केलेल्यांना पाऊस नीट समजलाच नाही,
धरती मात्र लोकानुनय करीत राहिली,
पण पाऊस मात्र यावेळी परतलाच नाही.

प्रेमधारा बरसवायला पाऊस आतुर असतो,
जलधारांनी ओथम्बलेला प्रेमातुर  दिसतो,
पण यावेळी त्याने प्रेमगीत गायलेच नाही
एकदा जो गेला तो पुनः परतलाच नाही.

काय करावे आता धरतीला कळेना झाले,
कसे आणावे पावसाला तिला उमजेना झाले,
तिची तगमग बघून पावसालाहि राहवले नाही,
निरोप धाडला त्याने,
पुढच्यावेळेस आलो कि बरसल्याशिवाय जाणार नाही.
ओथम्बलेल्या धारांनी चिंब केल्याशिवाय जाणार नाही.

Sunday, 4 October 2015



तुझ्या भुरभुरणाऱ्या केसांची
आठवण आहे मला,
म्हणून तर जगण्यामध्ये,
अजुनही रस आहे मला …. (१)


तुझ नसेल प्रेम माझ्यावर,
पण बोलू तरी नकोस,
माझा जगण्याचा आधार आहेस तु,
तो असा मोडु तरी नकोस …. (२)


माझ्या मनात काय आहे,
तुला कधी कळेल का,
शब्दही आटले माझे आता,
पण तुला कधी ते समजेल का …. (३)


इसे तुम प्यार समझो या मेरी कमजोरी फराज,

अब नींद भी जागती है तो बस तुम्हे सोचते …. (१)



तुम कहते हो, तुम्हे प्यार नही मुझसे फराज,

शिकायत तब होती, अगर ऐतबार न होता मुझसे  …. (२)



तुमसे प्यार का इक्बाल ए जुर्म कर दिया हमने फराज, 

अब सजा दो या वफा, तुम्हारी मर्जी …. (३)



दो बुंद क्या निकले उसकी आंखोंसे फराज,

यहां तो बारीशोके जमाने आ गये …. (४)

पाऊस आणि तु  :

हा पाऊस जेव्हा जेव्हा येतो, तुझी आठवण घेऊन येतो,

तुझी सय आली कि, डोळ्यात पाणी होऊन येतो,

पाऊस पण तुझ्यासारखाच थोडा लहरी आहे,

येतो तर सोसाट्याच्या वाऱ्यासारखा, 

उचंबळून प्रेम करणाऱ्या प्रेयसिसारखा,

नाहीतर दडतो ढगांच्या पडद्याआड,

खोडी काढून लपलेल्या मुलासारखा,

माझ्या अंतरंगात भरला आहे हा पाऊस आणि,

रोमरोमात दाटल्या आहेत तुझ्या आठवणी,

तुझ्या हरवलेल्या आठवणी, आठवून देणारा हा पाऊस,

तुझ्या केसांच्या बटांसारखा, भुरभुरणारा पाऊस,

तुझ्या पाणीदार डोळ्यांतील चमक घेऊन,

विजेशी लपंडाव करणारा पाऊस,

तुझे खळाळते हास्य होऊन, सभोवार कोसळणारा पाऊस,

तुझ्या निरामय सौन्दर्यासारखा, निसर्ग खुलवत येणारा पाऊस,

तुझ्या शब्दांच्या फणकाऱ्यासारखा, ढगांचे काळीज चिरत येणारा पाऊस,

तु नसताना, गुपचूप ठिबकून जाणारा पाऊस,

तु रागावलीस कि, दूर जाऊन बरसणारा पाऊस,

तु बरोबर असलीस कि, ओलेचिंब करून जाणारा पाऊस,

कस वेगळं करू तुला आणि या पावसाला,

तुम्हीच तर रंग भरलेत माझ्या जगण्याला,

जेव्हा जेव्हा हा पाऊस तुझी आठवण घेऊन येतो,

आणि तुझी सय आली कि, डोळ्यात पाणी होऊन येतो. 

Friday, 2 October 2015



तेरी खामोशी  :

जीस दिन कोई बात नही होती तुमसे,

बडी देरसे गुजरता है दिन,

खामोष रुके हुए पानी कि तरह,

बेजानसा गुजरता है दिन,

एक गुजारीश है तुमसे मेरी,

जानते हो तुम, बेबाकसी है जिंदगी मेरी,

कुछ नासाज हरकत हो मुझसे,

रुठना ना तुम,

टूट जाऊंगा अगर युं खामोश रहोगे तुम,

मेरे जीने के लीये तेरा एकही लब्ज काफी है,

जो तुम पुछो "बता यार तेरे मिजाज कैसे हैं"