Tuesday, 21 October 2014

माझे विचार :

संतांची पुण्यभुमी, परंपरा असलेल्या या महाराष्ट्र समाजमनाला त्यांचे वा आचार वा आचार नाहि बदलु शकले, तर या आजकालचे जे भोंदु बाबा, बुवा, बापु, दादामहाराज, सत्यसाई जे स्वतःच भौतिक भोगांचे पाईक आहेत. ज्यांचे स्वतःचे आध्यात्मिक ज्ञान यथातथाच आहे. पण लोकांचे अज्ञान व एकुणच आजकाल जगण्यासाठी वाढलेली स्पर्धा यामुळे मनाची अस्थीरता वाढत चालली आहे व त्यामुळे समाज या पाखंडी लोकांच्या (अप) प्रचाराला भुलुन त्यांच्या आहारी जातो व बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे अधिकाधिक खोलात रुतत जात आहे.
थोडा सारासार विचार केला तर आपल्याला कळेल कि जर हे खरोखर साधु-संत म्हणजे सर्वसंग परित्याग केला आहे, रजो-तमो गुण ज्यांच्या अंकित आहेत, भौतिक भोगांची ज्यांना लालसा नाही असे जर आहेत तर मग यांचे भक्त दारीद्र्यात आणि हे ऐश्वर्यात कसे, संपत्तिचा संचय हे कोणासाठी करतात, एखाद्या धंदेवाईक घराण्याप्रमाणे यांची घराणी कशी तयार झाली, यांच्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे सिध्द होऊनही हे पुण्यात्मा कसे, राजसत्तेला शरण गेलेवे हे भोंदु समाजाच काय भल करणार?
हे प्रश्न आपले आपल्यालाच पडतात, पण समाजमन सध्या एवढ निबर झाल आहे कि त्याला या असल्या प्रश्नांची ऊत्तरे शोधण्यात काही रस नाही, आणि म्हणुनच हजारो संत व सुधारकांची भुमी म्हणजे महाराष्ट्र अशी शेखी मिरवणारया या महाराष्ट्र देशात अंनिसचे संस्थापक डाॅ नरेंद्र दाभोळकरांचा मारेकरी अजुनही मोकाट फिरतोय आणि हि महाराष्ट्रासाठी फार शरमेची बाब आहे.

जय महाराष्ट्र 

No comments:

Post a Comment