Monday, 27 October 2014

सांसोमे तेरीही महेक आती है,
निंदभी तेरेही ख्वाब सजाती है,
जितनी कोशिष करता हुं तुझसे दुर जाने कि, 
ए जिंदगी, 
हर कतरेमे तु हि तु नजर आती है.

Friday, 24 October 2014


दौलत के लिये जिस्म बिकते है ये तो सुना था,
दिल के भी खरीदार देख के दंग रह गये.

मैने तो बस दिल से दिल मिलाने कि बात कि थी,
पर उन्होने अपनी किमत बतादी तो दंग रह गये.

इंसानियत पे मेरा खासा ऐतबार था साहब,
जब अपने हि पराये हुए देखके दंग रह गये.

उनकी खातीर फ़र्शपे अपना इमान हमने रख दिया था,
उस इमान को गिरवी रखते देख दंग रह गये.

दौलत के लिये लोग अंधे होते है ये सुना था,
खुन के रिश्ते भी तुटते देख दंग रह गये.

क्या पाया तुने ए इन्सान इस दौलत को कामाके,
पर मसीहा को भी इन्सान बनते देख दंग रह गये.

Thursday, 23 October 2014

आईना भी अब मुझसे सवाल करने लगा है,
चेहरे कि खामोशीसे, दिल का हाल पुछने लगा है,
पर वो भुल गया कि मै भी बहुत शातीर हुं,
जो सबसे छुपाया मैने, वो उससेभी छुपाने लगा हुं. 

शिवसेना, मनसे = मराठी माणुस (?)

१ मे १९६० या दिवशी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. त्याआधी संपुर्ण भारत भाषावार प्रांतरचनेने विभागण्यात आला होता. फक्त आत्ता आपण ज्या गुजराथी भाईच्या नादी लागुन पंतप्रधान निवडला आहे, त्या गुजराथी लोकांमुळेच मुंबई गुजराथला जोडणार होते हे पण विसरून चालणार नाही. पण अत्रे, जोशी, बापट, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार यांनी विरोधाचा असा काही धुरळा उडवला कि मुंबई महाराष्ट्रातच राहिली. पण त्याकरता कित्येक लोकांना हुतात्मा व्हावं लागलं आणि त्यात एकही गुजराथी नव्हता. त्यावेळी मुख्यमंत्री होते मोरारजीभाई देसाई. आपण जन. डायरला जालियानवाला बाग हत्याकांडाबद्दल गुन्हेगार मानतो, मग यांचं काय? तो तर परका होता. पण हे सहीसलामत सुटले. त्यावेळी देशाचे संरक्षण मंत्री होते श्री. यशवंतराव चव्हाण. पण तेही मराठी असुनही विरोधकच.

एवढं होऊनही मराठी माणसाला न्याय मिळाला का? तर नाही. मुंबईत वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती चालू झाली आणि त्यात मुख्यत्वेकरून मद्रासी माणस भरण्याचा सपाटा चालु झाला. तेव्हा शिवसेनेला काम मिळालं. उठाव लुंगी बजाव पुंगी अशी अत्यंत अश्लील टीका करत बाळासाहेब ठाकरे मराठी बचाव समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष झाले. आज जे भैय्या लोकांचं झालं होता, तेच त्याकाळी मद्रासी लोकांचं झालं होत. एवढं करून मराठी माणसाचा त्याच्याच भुमीतील अस्तित्वाचा प्रश्न मिटला का? तर नाही. पण शिवसेनेला लोकप्रियता मिळाली, मराठी माणसांच्या हक्क्काची जपणूक करणारी सेना म्हणुन. पण हा आनंद काही कालच टिकला. कारण ज्या अत्रेंनी संयुक्त महाराष्ट्रासाठी जीवाचा रान केल, त्याच अत्रेंना निवडणुकीत पाडण्यासाठी शिवसेनेने पण जीवाचं रान केल. ठाण्याच्या सभेत अत्रेंवर चप्पल भिरकावण्याएवढी मजल शिवसेनेने मारली. स्वताच्या स्वार्थापुढे व कॉंग्रेसच्या भल्यासाठीच शिवसेनेने तेव्हाही स्वतःला वापरू दिल. त्याबद्दल खंत ना खेद.

दुसरा धक्का मराठी माणसाला बसला जेव्हा कॉ. कृष्णा देसाई यांचा खुन झालं तेव्हा. हा इथला पहिला राजकीय बळी शिवसेनेच्या नावावरचा. तेव्हाही शिवसेनेवर प्रचंड टीका झाली कॉंग्रेसचा बगलबच्चा असल्याची. लाल बावटा युनिअन संपवण्यासाठी कॉंग्रेसने शिवसेनेला हाताशी धरल, आणि हा इतिहास आहे. त्यानंतर पण शिवसेनेने कॉंग्रेससाठी काम करत असल्याची बरीच उदाहरण आहेत. जस दत्ता सामंत यांची हत्या. विजु नाटेकर याची हत्या. हि सगळी मराठी माणसचं होती.

शब्द उधळण्यापेक्षा जास्ती काम काहीच केल नाही आहे शिवसेनेने मराठी माणसासाठी. तस नसत तर बेळगाव आज महाराष्ट्रात असता. फक्त शाब्दिक कोट्या करत मराठी माणसांच्या भावनेला हात घालुन मराठी अस्मितेचा मुद्दा संपुर्ण चुकीच्या पद्धतीने पुढे आणुन मराठी माणसाचं खच्चीकरण जर कोणी केल असेल तर ते नक्कीच शिवसेनेने. विचार करा आज कित्येक वर्ष मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या हाती आहे. पण तरीही मुंबईत महाराष्ट्र राहिलंय का ? किती खराब स्थिती आहे. रस्ते खराब, घाणीच साम्राज्य, पाण्याची वानवा. दळणवळणाची साधनं पुरेशी नाहीत. प्रश्न विचारलेकि  राज्य सरकारकडे बोट दाखवायचं. महानगरपालिकेच्या शाळांची हालत बघा. जे शक्य होता ते शिवसेनेने कधीच केल नाही. फक्त मराठी माणसाच्या नावाने राज्य केल व स्वताची राजकीय आकांक्षा पूर्ण केली. आणि हे सत्य बाहेर आल जेव्हा पार्लमेंट मध्ये पहिला आमदार म्हणुन सेनेने प्रीतीश नंदी यांची नीवड केली. कोणी लायक मराठी माणुस नव्हता?

आज आपण छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांना शिव्या घालतो, पण या सर्वाना हि ओळख दिली कोणी. हि सर्व याच पूर्णामाइची लेकर आहेत. शरद पवार यांचे राजकीय विरोधक पण सामान्य जीवनात घनिष्ठ मैत्र. हे कसले असले मैत्र. औरंगझेब  आणि शिवाजी मैत्र असल्याचे दाखले आहेत का इतर फावल्या वेळेत? हे असले मैत्र काय कामाचे. संजय दत्त सारख्या माणसाला ज्याचे मुंबई घातपात घटनेमध्ये हात होता अशा माणसाला सोडवण्यात यांनी धन्यता मानली. तेव्हा मराठी माणसाचा नाही विचार केला तो. जे जे हत्याकांडाच्या हत्यार्याना शरद पवार आपल्या विमानातुन घेऊन गेले, आणि तरीही यांची मैत्री. यात मराठी माणसाचा अपमान नाही का? मुंबईवर फक्त आम्हीच राज्य करणार, कसाही करणार, कोणी विरोध केला तर वैचारिक विरोध न करता हाणामारी करायची हेच काम गेली कित्येक वर्ष शिवसेना करत्ये. यात कुठे आहे मराठी माणसाची भलाई.

मराठी माणसाला वडापावच्या गाड्या टाकण्यासाठी उद्युक्त केल कोणी? का नाही चांगले व्यवसाय करण्यासाठी पाठबळ दिल. ज्या लोकांची वरती नावे घेतली आहेत हि सर्व मंडळी गब्बर आहेत. का त्यांनी मदत नाही केली मराठी तरुणांना. कारण त्यांना हे करायचच नव्हत. मराठी तरुणांना भाषिक मुद्द्यावर गुंतवून ठेवून स्वतःची व इतर व्यावसायिकांची भले ते परप्रांतीय वा परभाषिक असोत तुंबडी भरायचं काम फक्त सेनेने आजवर केले आहे.

कॉंग्रेसला कायम घराणेशाहीबद्दल दोष देणाऱ्या सेनेने पण तेच केल. पाठचा पुढचा विचार न करता फक्त स्वताच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना पक्ष प्रमुख केल, लोकांच्या नाराजीच विचार न करता. परिणाम संमोर आहेतच. सर्वच ठिकाणी शिवसेनेची पीछेहाट.

त्यामुळे किंवा त्यासाठीच राज ठाकरे पक्षातुन बाहेर पडले अस म्हणतात. पण मला तर वाटत कि भागीदारी वाटुन खाण्यासाठी केलेली हि राजकीय तडजोड आहे. कारण इतक्या वर्षात त्यांच्या पक्षानेही भैय्या हटाव या मोहिमेवयतिरिक्त   काहीच भरीव (?) कामगिरी केली नाही आहे. फक्त बोलाचा भात आणि बोलाची कधी एवढीच त्यांची अजुन ओळख आहे. जी काही आंदोलन चालु करायची ती अचानक बंद करायची, का चालु करायची, का बंद करायची, फलित काय, हे असले अडाणी प्रश्न यांना पडत नसावेत आणि कोणी विचारलेले यांना चालत नाहीत. कि पोचलीच यांची सेना त्यांच्या दारी. दहा वर्ष झाली यांना पक्ष सुरु करून. पण सुपारीबाज आंदोलक हि ओळख आहे या पक्षाची. मग का म्हणुन यांना मराठी माणसांनी मत द्यायची? काय केलय यांनी मराठी माणसांसाठी.

असा सगळा वैचारिक गोंधळ माजवलाय या दोन पक्षांनी. मराठी माणसाच्या भाषिक अस्मितेला हात घालुन स्वतःची राजकीय गणित सोडावयाची कामगिरी मात्र यांनी उत्तमपणे केली आहे. मत चांगल्या माणसाला द्या. भाषेला, धर्माला नको. आपण मित्राला विचारतो का असले प्रश्न. तसच आहे हे पण. चांगला माणुस मग तो कुठल्याही पक्षाचा, धर्माचा, भाषेचा असो त्याला मत द्या. लिहायचं म्हंटलं तर बरच काही लिहिता येईल, पण जे मला दिसले ते मुद्दे इथे मांडले, त्याचा प्रतिवाद होऊ शकतो. आणि त्यातही आजच्या जागतिक अर्थकारणाच्या काळात भाषिक आणि वांशिक मुद्दे गौण ठरतात. भारतीय बना. महाराष्ट्रीय, मराठी तर आहोतच.

जय हिंद, जय महाराष्ट्र.

Tuesday, 21 October 2014

ती पावसाळी रात्र :

अशीच एक पावसाळी रात्र होती
ती कुठेतरी आसपासच होती

दिसत नव्हती पण जाणवत होती
प्रत्येक थेंबासरशी भिजवत होती

मी तर काय भीजायला तयारच होतो
तीच्या येण्याचीच काय ती वाट पहात होतो

ती आली, पण पाऊसच थांबला
तीला पाहुन तो  ही बरसायच विसरला

आसमंतात मस्त सुगंध पसरला
तिला पाहण्यासाठी चंद्रही विसावला
ती आली तशीच निघुन गेली

कस सांगु काय देऊन गेली
ती गेल्याबरोबर पावसाने आपला रंग दाखवला

वेड्यासारखा बरसायला लागला
बेलगाम वारुसारखा ऊध्अळायला लागला

ती पुन्हा येईपर्यंत हे असेच चालणार
तीची वाट पहात हा असाच बरसणार
माझे विचार :

संतांची पुण्यभुमी, परंपरा असलेल्या या महाराष्ट्र समाजमनाला त्यांचे वा आचार वा आचार नाहि बदलु शकले, तर या आजकालचे जे भोंदु बाबा, बुवा, बापु, दादामहाराज, सत्यसाई जे स्वतःच भौतिक भोगांचे पाईक आहेत. ज्यांचे स्वतःचे आध्यात्मिक ज्ञान यथातथाच आहे. पण लोकांचे अज्ञान व एकुणच आजकाल जगण्यासाठी वाढलेली स्पर्धा यामुळे मनाची अस्थीरता वाढत चालली आहे व त्यामुळे समाज या पाखंडी लोकांच्या (अप) प्रचाराला भुलुन त्यांच्या आहारी जातो व बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे अधिकाधिक खोलात रुतत जात आहे.
थोडा सारासार विचार केला तर आपल्याला कळेल कि जर हे खरोखर साधु-संत म्हणजे सर्वसंग परित्याग केला आहे, रजो-तमो गुण ज्यांच्या अंकित आहेत, भौतिक भोगांची ज्यांना लालसा नाही असे जर आहेत तर मग यांचे भक्त दारीद्र्यात आणि हे ऐश्वर्यात कसे, संपत्तिचा संचय हे कोणासाठी करतात, एखाद्या धंदेवाईक घराण्याप्रमाणे यांची घराणी कशी तयार झाली, यांच्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे सिध्द होऊनही हे पुण्यात्मा कसे, राजसत्तेला शरण गेलेवे हे भोंदु समाजाच काय भल करणार?
हे प्रश्न आपले आपल्यालाच पडतात, पण समाजमन सध्या एवढ निबर झाल आहे कि त्याला या असल्या प्रश्नांची ऊत्तरे शोधण्यात काही रस नाही, आणि म्हणुनच हजारो संत व सुधारकांची भुमी म्हणजे महाराष्ट्र अशी शेखी मिरवणारया या महाराष्ट्र देशात अंनिसचे संस्थापक डाॅ नरेंद्र दाभोळकरांचा मारेकरी अजुनही मोकाट फिरतोय आणि हि महाराष्ट्रासाठी फार शरमेची बाब आहे.

जय महाराष्ट्र 

(1) अशीच एक संध्याकाळ, (2) पाऊस आणि ती :


अशीच एक संध्याकाळ :

आठवणीत आहे का ती संध्याकाळ,
हातात हात गुंफलेले
नजरेत नजर मिसळलेली
फक्त मनाशी मनाचा संवाद.
तांबडे लाल सूर्यबिंब अस्ताला जातंय, 
तुझ्या गालांचा रक्तिमा त्याची साक्ष देतोय.
तुझ्या डोळ्यांमध्ये पण त्याचंच प्रतिबिंब उमटलय.
वाऱ्याच्या झुळुकेनी तुझ्या रेशमी केसांचा पतंग केलाय,
ते सावरताना होणारी तुझी मोहक हालचाल,
मी डोळ्यात साठवली आहे अजून.
वेळ कसा गेला कळलं नाही,
परतीची वेळ झाली तरी,
एक शब्दही आपण एकमेकांशी बोललो नाही.
पण तरीही, किती बोलकी होती ती संध्याकाळ,
हातात हात गुंफलेले,
नजरेत नजर मिसळलेली, आणि
फक्त मनाशी मनाचा संवाद.



पाऊस आणि ती :

फार दिवस नाही झाले त्या घटनेला,
जेव्हा पाऊस पण हट्टाला पेटलेला, आणि
तुझ्या आठवणीने जीव टांगणीला लागलेला.
कशाची ओढ लागली होती ते कळेना,
मला तर तुझ्याशिवाय काहीच स्मरेना,
पण तुझी तर काहीच खुणगाठ दिसेना....
दिसलीस तेव्हा उशीर झाला होता,
ती तू नव्हतीस जिचा मी विचार केला होता,
भ्रमनिरास काय असतो, त्याचा प्रत्यय आला होता.
पण आता मी त्यातून सावरलो आहे,
मानवी मूल्यांचे नव्याने धडे गिरवतो आहे,
जीवन म्हणजे रोजचाच संघर्ष आहे,
त्याचा सामना करतो आहे.




Sunday, 19 October 2014

फिर वोही दिवाली :

फिर वोही दिवाली :

हर दिवाली मुझे कुछ याद दिलाती है,
उसकी गहरी आंखे मेरे सामने आती हैं.
लगता हैं कुछ पुछ रही हैं वो,
किसी बात का जवाब मांग रही हैं वो.
जानता हुं मै उन आखोंका राज,
जिनमे कभी ढुण्ढता था मै अपना कल और आज,
कालेज के दिनोमे पहचान हुई थी हमारी,
दिन ब दिन कम हो रही थी हमारे बिचकि दुरी,
बहुत प्यार करती थी वो मुझसे, और शायद मै भी.
सबसे लडती थी वो मेरे लिये, 
शायद मै लायकहि नही था जिसके लिये.
कितने सपने देखते थे हम मिलके, 
वो साथ हो तो लगता था बहुत करीब हैं हम मंजीलके.
पर वक़्त भी अपनी चाल चल रहा था,
मै अभी तक जिंदगीमे सेटल नही हो पा रहा था.
वो फिर भी मुझपे भरोसा कर रही थी,
मेरे लिये मोहलत पे मोहलत मांगे जा रही थी.
पर मेरा नसीब भी सिकंदर नहीं था उस वक़्त,
और वो भी बेचारी इंतजार करती कब तक.
एक दिन आया जब हमे फैसला लेना हि पडा,
वक़्त के दावं पेंच के आगे झुकना हि पडा.
आंसू भरे नैनोसे हम एक दुसरे से अलग हो गये,
एक कश्ती के मुसाफिर थे हम, पर अब किनारेहि अलग हो गये.
पता नही वो कौनसे शहर चली गई, 
उस दीनसे मेरी भी तो दुनियाहि बदल गई,
उसकी वो पानी पानी आंखे आज तक मेरा पिछा करती हैं,  
मेरा क्या कुसूर था ये पुछती रहती हैं, 
शायद मै उसे समझा पाता मेरी मजबुरी, 
बीना उसके मेरी भी जिंदगी थी अधुरी.
आज जीवन मे मैने बहुत सफ़लताए हासील कि हैं,
पर उस दिन जो खो चुका वो कभी ना पाया मैने.
वो दिन भी दिवाली का हि था,
कुछ पटाखे जला रहे थे आसामा को,
तो कुछ आग लगा रहे थे मेरी आत्मा को.
तो कुछ आग लगा रहे थे मेरी आत्मा को.

Saturday, 18 October 2014



कुछ बाते करनी है तुमसे,
जो अधुरी है अभी,
कभी फुरसतमे मिल लेना तुम
एक मुलाकात जरुरी है अभी

जाने तुमने क्या कहा था,
जाने तुमने क्या सुना था,
उन बातोको सुलझाना बाकी है अभी,
कभी फुरसतमे मिल लेना तुम
एक मुलाकात जरुरी है अभी.

बेवजह रीश्तोमे दरार ठीक नही,
इस तरह गुमसुम रहना ठीक नही,
बातोसे हि बात बनती है सभी
कभी फुरसतमे मिल लेना तुम
एक मुलाकात जरुरी है अभी.