दिनांक : ०२ डिसेंबर २०१५
एक जाणीव शेअर करतो. झालंय काय कि, टी पी सुरु झाल्यापासून, तो मिनी ट्रक मीच चालवतोय. आणि आता माझा त्याचावर पूर्ण कंट्रोल आलाय अस मला वाटतंय. आणि तसा आता वेळ कमी मिळतो, मग कुठेही येणजाण पण कमी झालं, त्यामुळे कार चालवण्याचे प्रसंग कमीच येतात. काल अचानक दुपारी एक काम होत म्हणून मी श्री ला म्हंटल कि आज तू माझी कार घेऊन ये. पण नंतर कार चालवताना असा जाणवल कि थोडी गडबड होत्ये चालवताना. काहीतरी चुकतंय. प्रत्येक वाहनचालकाचा आपल्या वाहनावर हात बसलेला असतो. पहिला गिअर टाकल्यापासूनच ते लगेच लक्षात येत. पण गेल्या दीड महिन्यात माझे माझ्या कारकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. ट्रक वर ताबा मिळवताना मी कारचा कंट्रोल सोडत होतो हे लक्षातच नाही आल, कारण दोन्ही गाड्या चालवण्याच टेक्निक थोडं वेगळ आहे. त्यामुळे असाव पण मला कार चालवताना जरा सांभाळून चालवावी लागत होती. ज्या माझ्या कारने मला ड्रायविंगचा मजा दिला, जिला मी मला हवी तशी चालवू शकत होतो, आज मला तिची ओळख थोडी पुसली गेल्यामुळे सांभाळून चालवावे लागत होते. म्हंटल तर दुर्लक्ष करण्यासारखा प्रसंग, पण विचार केला तर खूप काही शिकवून जाणारा.
जर निर्जीव कारकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रसंग येत असेल, तर काही जिवलग नात्यांकडे नकळत दुर्लक्ष झाले तर काय होईल, असा विचार मनात आला आणि हादरून गेलो. आत्ताआत्तापर्यंत जे मित्र किंवा नातेवाईक आपल्या खूप जवळ होते, ज्यांच्यावाचून आपल्याला करमत नसे, दिवसभरात एकदातरी ज्यांच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला चैन पडत नसे, अश्या व्यक्तींकडे जर नकळत का होईना आपल्याकडून दुर्लक्ष होत असेल, तर त्यांना काय वाटत असेल. समजून घेतलं तर ठीक, पण नाही समजून घेतलं तर. घरात म्हातारे आई वडील असतात, आज त्यांच्यामुळेच आपण इथवरचा प्रवास केलेला असतो, मुल असतात म्हणजे पुढची पिढी, या सर्वाना वाटत असत कि रोजच्या कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ तरी आम्हाला द्यावा. अगदी तासंतास गप्पा नाही मारल्या तरी निदान चौकशी करावी बास, एवढीच माफक अपेक्षा असते बऱ्याचदा या सर्वांची. पण आपण आपल्यातच इतके गुंग असतो कि या सगळ्याचा आपल्याला विसर पडतो. नाती टिकवायला संवाद जरुरीचा असतो हा मुख्य नियमच आपण विसरून जातो. आणि जेव्हा लक्षात येत ना तेव्हा थोडा उशीर झालेला असतो. नाती तुटत नाहीत, पण त्यातला ओलावा नष्ट झालेला असतो.
मान्य आहे कि आजचे आयुष्य खूप धकाधकीचे आणि आव्हानांचे आहे. माणूस स्वतःबरोबरच वेळेशीही झुंज खेळतोय. कितीही मनात आल तरी कित्येकदा प्रत्यक्ष भेट घेण नाही शक्य होत. पण हि धकाधकी तर आता जीवनाचा मुख्य भाग आहे आपल्या, तिच्यापासून तर दूर पळता येणारच नाही. पण ते करताना जर आपण आपले आईवडील, पत्नी, मुल, मित्र व इतर आप्त यांच्यासाठी अधूनमधून थोडा वेळ काढला तर काय बहार येईल बघा. सगळाच समतोल साधला जाईल. या सर्वांशी बोलल्याने तुम्हालाही थोडा विरंगुळा वाटेल आणि त्यानाही थोडं बर वाटेल कि बघा एवढ्या व्यापातून पण हा आमच्यासाठी थोडा का होईना पण वेळ काढतोच. संवाद खूप महत्वाचा भाग आहे मानवी जीवनातला. संवाद नसेल तर नाती तुटायला वेळ लागत नाही, मग ती कितीही जवळची का असेना.
सांगायचा मुद्दा हा कि, माझा माझ्या कारशी संवाद कमी झाला होता, तर ते निर्जीव यंत्र पण साथ देईना झालं, मग भावभावनांचा कल्लोळ असलेल्या मनांच काय होत असेल. आता ठरवलंय कि कितीही बिझी असलो तरी योग्य तितका वेळ सर्वांनाच द्यायचा, मग ती कार का असेना ….
Khupach chhan Gokya. Patala ekdam
ReplyDeleteKhupach chhan Gokya. Patala ekdam
ReplyDeleteमलाही पटलं ...मस्त जमुन आलंय !
ReplyDeleteछानच लेख......
ReplyDeleteअगदी बरोबर गोकुळ...चला आचरणात आणूया
ReplyDeleteअगदी बरोबर गोकुळ...चला आचरणात आणूया
ReplyDeleteThanks a lot Dipali Chitra Maya Manjiri
ReplyDeleteThanks a lot Dipali Chitra Maya Manjiri
ReplyDelete