Saturday, 27 February 2016

आज प्रकर्षाने तुझी आठवण आली. तुला विसरलो नव्हतोच कधी, पण आज तू हवी होतीस, अस वाटल. तू माझी कोण होतीस या गोष्टीला आता काही अर्थ उरला नसला, तरी एक नक्की, तू माझी गरज होतीस. माझा आधार होतीस. मी विस्कटलो कि मला सावरणारी तूच एक होतीस. तु जेवढ मला समजून घेतलस, तेवढे कोणी प्रयत्न पण नाही केले. जगात वेड्या माणसाना किंमत नसते. सर्वाना शहाणी माणस हवी असतात. आणि तू मात्र या वेड्याला कधी तू वेडा आहेस हे जाणवू पण नाही दिलंस. हा तुझा शहाणपणा होता कि वेडेपणा यावर लोक चर्चा करतील. पण मी मात्र सदैव तुझा ऋणी राहीन, कि या वेड्या माणसाला तू आहेस तसा स्वीकारलस. कधीच उपदेशाचे डोस नाही पाजलेस. 

तू असताना कधी एकट अस वाटलच नाही. कुठल्याही प्रसंगात तू कायम बरोबर असायचीस. फक्त सल्ले नाही द्यायचीस. बरोबरीने उभी राहायचीस. खूप आधार वाटायचा तुझा मला. पण हे अस कुठवर चालणार होत. तू स्वतःचा काही विचार करतच नव्हतीस. जशी काही फक्त माझ्यासाठीच जगत होतीस. माझी पूर्ण जबादारी स्वीकारल्यासारखी. माझ्या भविष्याचा पत्ता नव्हता, पण तुझ्यापुढे पूर्ण आयुष्य पडलं होत. माझ्यासाठी तू खस्ता खावयास हे मनाला पटत नव्हत माझ्या. मग मीच तुला हळूहळू टाळायला सुरुवात केली. कुरबुरी काढून तुझ्याशी फटकून वागायला लागलो. आणि शेवटी तो दिवस उगवलाच. तुझा अखेरचा निरोप पण मी नीट नाही घेतला, आयुष्यात पहिल्यांदा तुला पाठ दाखवली. तोंड दाखवायची हिम्मत नव्हती म्हणून नव्हे तर, माझे रात्रभर रडून सुजलेले डोळे तुला दाखवायचे नव्हते. नाहीतर तू तुझा निर्णय बदलला असतास याची मला खात्री होती. तू तशीच होतीस. पाठमोरी, पाय खेचत नेणारी तुझी आकृती बघून मात्र माझा बांध फुटला आणि मी पुन्हा एकदा वेड्यासारखा डोळ्यातून समुद्र सांडत सैरावैरा धावत सुटलो. तो आजवर थांबलोच नाही. 

आयुष्य पुढे सरकत गेल. वाटा शोधत गेल. पडलो, धडपडलो, रडलो. तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही. प्रत्येक ठेचेला तुझी आठवण यायची, मग मी सावरायचो. भीती वाटायची कि असाच रडत राहिलो तर तू स्वतःचा संसार सोडून माझ्यासाठी परत येशील. स्वतः विस्कटून मला सावरायला. 

एवढ्या लांबच्या प्रवासात खूप प्रवासी भेटले. काही मित्र झाले, काही सोडून गेले. प्रत्येक गोष्टीत वाकडा अर्थ काढणाऱ्या माणसाला कोणीही किती काळ आणि का सहन करेल. स्वभावातले स्वाभाविक दोष कळल्यावर लोक टाळायला लागले. मला कळायच कि दोष सर्वस्वी माझाच आहे. पण मला सवय लागून गेली होती किंवा तू कधी माझ्यातील दोषांना दोष मनालाच नाहीस, त्यामुळे असेल पण मला ते कधी दोष वाटलेच नाहीत. आणि तसही समुद्रात पोहोणाऱ्याला, तलावात पोहायचं अप्रूप नसतं. तसच ज्याची तुझ्याशी मैत्री होती, त्याला असल्या लोकांची काय मातब्बरी. 

पण तरीही कधी कधी मागे वळून पाहताना, आयुष्याचा हिशेब मांडला, तर माझ्या बाजूला शुन्य उरते. तुला गमावले आणि सर्वस्व गमावल्यासारखे झाले. पण तू खूप आठवणी सोडून गेलीस माझ्यासाठी. तुझी एक एक आठवण माझा श्वास आहे आता. कधीही एकटा पडलो कि तुझी आठवण येते. अस वाटत तू अजूनही बरोबर आहेस. आणि माझा हात हातात घेऊन मला धीर देत्येस. मग मी खूप धीराने डोळ्यातून ओघळायला आतुर असलेले अश्रू परतवून लावतो, कारण मला अजूनही वाटत, माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तू परत येशील माझ्यासाठी. मला खात्री आहे त्याची. तू आहेसच तशी. 

Monday, 25 January 2016



तु कहता है तो छोड दू तेरा शहर,
पर कहीं ऐसा ना हो,
तू धुंढे मुझे, और तेरी आंखे सवाली हो … 




तेरे जख्म भी सह लुंगा ख़ुशी ख़ुशी,
कभी दिलसे मेरे खेल के तो देखो …. 




जानता हुं मै, अकेले आया हुं, अकेले जाना है,
ये भी सच है, तेरे तसव्वूरसे सफर आसां हो जाना है …. 




या अश्रुंच मोल तुला तेव्हांच कळेल,
तुला हवस वाटणारं कोणी जेव्हां,
'तुला' नाही म्हणेल …



तुला विसरू म्हंटल,
तर मग जीवनात लक्षात ठेवण्यासारखं आहेच काय …. 




अपनी आंखोसे परदा हटा दो अब नासमझिका,
न वोह झूट बोल पाती हैं,
न सच छुपा पाती हैं …. 


काय झाले माझ्या मना,
समजून तू घेशील का,
कविता हे सर्वस्व माझे,
तीज अर्थ तू देशील का. 

भाववेडे शब्द माझे,
भाववेडी कामना,
गुंफतो शब्दांत माझी,
भाववेडी कल्पना,
मांडण्या शब्दात सारे,
सामर्थ्य तू देशील का,
कविता हे सर्वस्व माझे,
तीज अर्थ तू देशील का. 

भेट झाली तुझी अचानक,
अन, शब्दग्रंथी पाझरल्या,
जपलेल्या त्या आठवणी तुझ्या,
कविता होऊनी कोसळल्या,
साठवलेल्या त्या क्षणांचे,
अर्ध्य मज देशील का,
कविता हे सर्वस्व माझे,
तीज अर्थ तू देशील का. 


ती : एकदा आली आणि जिंकून गेली 

शाळा सुटली, पाटी फुटली,
शाळामैत्रांची संगत सुटली,
इतक मोकळ आभाळ मिळालं,
कि आपापल्या विश्वात हरवून गेली,
गावे बदलली, शहरे बदलली,
कित्येकांनी तर देशाची हद्द ओलांडली,
अशाचं काही जणांमध्ये ती पण होती,
सातासमुद्रापार गेली होती,
शाळेत असताना जास्त बोलाचाल नव्हती,
एकमेकांच्या स्वभावाची काहीच जाणं नव्हती,
पण या तंत्रयुगाने तिलाही जवळ आणलं,
पण अजूनही नव्हत मन मनाशी जुळलं,
तो अबोला काही सुटेना,
बोलायचं तर खूप होत, पण काय बोलावं सुचेना,
तशातच तिचा मायदेशी येणं झालं,
हरवलेल्या आठवणीना भेटणं झालं,
जुने मैत्र नव्या रुपात भेटल्यावर,
मुळच्या खोडकर स्वभावाला नव क्षितीज मिळालं,
बोलण्यातला बुजरेपणा कुठच्याकुठे पळून गेला,
तिच्या या नव्या रूपाने ग्रुप मात्र हरखून गेला,
बोलणं तिच मृदू, पण स्वभाव तिचा मिश्किल,
कोणाची कशी फिरकी घेईल, हे सांगणं आता मुश्किल,
इथे असतो दिवस तेव्हा तिथे रात्र असते,
ती मात्र संवाद साधत रात्रीचा त्या दिवस करते,
कवितेची तिला आवड आणि चांगल्या शब्दांची तिला जाण आहे,
इंग्रजांच्या देशात राहूनही, मराठी तिचा प्राण आहे,
राहते जरी इतक्या दूर, तरी लक्ष तिच इथेही असते,
वावगं कोणी वागलं तर निषेधही ती प्रगट करते,
दिसायला पण ती सुंदर आणि बोलण्यात तिच्या माधुर्य आहे,
आगाउपणा थोडा आहे अंगात, पण वागण्यात तिच्या चातुर्य आहे,
वाटलं नव्हतं इतकी खुलून येईल ती,
इतकी मिसळून जाईल आणि फुलून येईल ती,
एकाच सफरीमध्ये ती मन सर्वांचं जिंकून गेली,
एक सुस्वभावी, समतोल विचारांची मैत्रीण आम्हाला मिळाली,
एका भेटीमध्ये तिचा परकेपणा संपून गेला,
इतके मिसळलो एकमेकांत कि,
अवघा रंग एकची झाला …. 

Monday, 4 January 2016


शब्द आणि वेदना :

काहीतरी लिहावं म्हणतोय केव्हापासुन,

सुचत नाही आहे काय लिहावं पण,

विषय तर खूप पिंगा घालतायेत मनात,

कळत नाही का लिहावं पण,

लिहून तुला समजेल का,

माझ्या मनातील वेदना तुला बोचेल का,

संवेदनांचा आगडोंब उसळलाय मनांत,

पण त्या वणव्याची धग तुझ्यापर्यंत पोचेल का,

नसेल तर मग व्यर्थ आहे सारे,

कशाला मग ती विषयातली गंभीरता वगैरे,

उगा उनाड वाऱ्याने उधळलेल्या पानांसारखे,

एक दिवस विचार पण माझे उडून जातील मनातून सारे,

यासाठीच मी लिहित नव्हतो,

मनातल्या वेदनांना शब्द पुरवत नव्हतो,

पण तुझा आग्रह मोडवेना झालं मला,

नाहीतर ठरवून लेखणीला हात लावणार नव्हतो,

खरच, कधीच लेखणीला हात लावणार नव्हतो ….